शुक्रवार, 16 मार्च 2012

शुक्रवार, 11 सितंबर 2009

नवी Aavhane

नवी आव्हाने
मुलांना गोष्टी सांगून त्यांचे भावविश्व समृध्द करणे हा गुरुजींचा आवडता छंद होता. त्यांच्या मृत्यूनंतर स्मारक करण्याऎवजी चैतन्यशक्ती चळवळीच्या रूपाने स्मारक साकारावे असे एका धडपडणाऱ्या मुलाला वाटले. १९५१ साली श्री. प्रकाशभाई मोहाडीकरांनी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा कथा सांगण्याचा कार्यक्रम अनेक शिक्षक नियमितपणे करू लागले. महाराष्ट्रातील पंधरा-वीस जिल्ह्यातील सुमारे चारशे प्राथमिक / माध्यमिक शाळांमध्ये या संघटनेच्या शाखा मुलामुलींच्या कथाकथनाच्या स्पर्धा होऊ लागल्या. संघटनेने सुरु केलेल्या कथाकथन प्रबोधिनीचे काम पुण्याच्या कार्यकर्त्यांनी चांगले चालवले आहे. नवनवे कथाकथनकार तयार करण्यासाठी शेकडोनी शिबिरे घेण्यात आली. कार्यकर्ते-शिक्षकांना उपयोगी पडतील अशी पुस्तके प्रकाशित करण्यात आली. "श्यामची आई" या पुस्तकावर आधारित परीक्षा घेण्याचा उपक्रम गेली काही वर्षे चालवला जात असून चार पाच हजार मुलेमुली त्यात आनंदाने भाग घेतात.
काथामाला संघटनेचे लोण गोव्यात केव्हाच पोहचले. तेथे राज्य पातळीवर नियमितपणे मुलामुलींच्या कथाकथन स्पर्धा घेतल्या जातात.
अन्य राज्यात कथामालेचे काम रुजावे यासाठी अनेक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. साने गुरुजींच्या अनेक पुस्तकांचा हिंदी अनुवाद स्वराज्य प्रकाशन दिल्ली यांनी प्रकाशित केला आहे. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात काही शाखा चालत आहेत. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातील काही कार्यकर्ते कथामालेचे काम त्यांच्या प्रादेशिक भाषांतून चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या काही वर्षात समाजजीवनात चंगळवाद थैमान घालू लागला आहे. मुलांनी एकमेकांचे मुडदे पाडणे, एकतर्फी प्रेमभंगाचे निमित्त सांगून रिंकू पाटील सारख्या कळ्या चुरगाळून टाकणे असले प्रकार वाढत चालले आहे. प्रसार माध्यमे हिंसाचार व भोगवादाला बेभानपणे उत्तेजन देत आहेत. या प्रवृत्तींचा मुकाबला करण्यासाठी शिक्षकांशी संवाद वाढवून त्यांची वैचारिक बैठक व सामाजिक बांधिलकी वाढवणे याकडे कथामाला विशेष लक्ष देऊ लागली आहे.
या संघटनेचे काम चारी दिशांनी वाढवण्यासाठी विविध साहित्य व साधने वापरली पाहिजेत. कार्यकर्त्यांनी दौरे काढून नवनवे शिक्षक जोडले पाहिजेत. परंतू हे सगळे करण्यासाठी संघटनेचा कायम निधी असणे आवश्यक आहे.ज्या सहॄदांना या कामाचे महत्व व आवश्यकता वाटत असेल तर आपल्या परिने मदत करावी. या आव्हानाला आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत . . . . . . . . . . . . . .
मदतीसाठी पत्ता -
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला
व्दारा- साने गुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग,
दादर (प.), मुंबई ४०००२८.
दूरध्वनी : (०२२) २४४४५९९६ / २४४५५९६९

मंगलवार, 1 सितंबर 2009

तरुण Pidhi

तरुण पिढी व भोगवाद
तरुण पिढीला हिंसाचार व भोगवादापासून वाचवा !
गेल्या काही दिवसात शाळेतल्या एका विद्यार्थ्याने दुसîrÉÉचा खून करण्याच्या अनेक घटना घडल्याचे वाचनात आले. शाळकरी मुलांपर्यंत हिंसाचाराचे लोण पोहोचणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच वर्ष अखेरचे निमीत्त साधून ३१ डिसेंबरला दारु पिऊन वाहने बेफाम चालवणे व तरुणींचा विनयभंग करणे, एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करणे आदि प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसाचार व भोगवादी प्रवृत्ती तरुण पिढीत शिरली तर संबंध राष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल.
आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करुन राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ही भूमिका पार पाडण्यासाठी शरीर, मन आणि बुध्दीला चांगले वळण देण्याच्या वयात आपली तरुण व बालकुमारांची पिढी बेफाट भोगलालसेच्या व हिंसाचाराच्या आहारी जात आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.
शांततेच्या मार्गाने समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याची व सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याची इच्छा असणाîrÉÉ सर्व नागरीकांनी वेळीच सावध होऊन नव्या पिढीमध्ये होऊ लागलेली हिंसाचाराची व चंगळवादाची लागण थांबवण्यासाठी निर्धारपूर्वक पावले उचलली पाहिजेत.
तरुण पिढी हिंसाचार व भोगवादापासून वाचवण्यासाठी - हे करा.
१. पालकांनी / शिक्षकांनी मुला-मुलींशी मोकळा संवाद वाढवावा.
२. हिंसाचाराचे मानस तयार होईल अशी खेळणी मुलांसाठी घॆऊ व भेट देऊ नयेत.
३. पालकांनी वाचन संस्कृती वाढवावी व आपल्या भागात साने गुरुजी कथामाला सुरू करण्यात पुढाकार घ्यावा.
४. भोगवाद आणि हिंसाचार यांची दृष्ये / बातम्या टी.व्ही. तसेच पेपरातून प्रसिध्द करु नयेत.
५. कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत भोगवादी व हिंसाचारी चित्रे देऊ नयेत.
६. हिंसाचार करणाîrÉÉ गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे.

शुक्रवार, 26 सितंबर 2008

गुरुवार, 18 सितंबर 2008

कथा म्हणजे

कथा म्हणजे गॊष्ट. आज ही गोष्टीला पूर्वी इतकच महत्व आहे. आज मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरी गोष्टीच वेड कमी झालेल नाही. गोष्ट अबालवृध्दाना आवडते. विविध धर्मग्रंथामध्येही अनेक कथा ठासून भरलेल्या आढळ्तात. प्रवचनकार व किर्तनकार आपल्या प्रवचनातून वा किर्तनातून आपला विचार श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेक कथांचे कथन करीत असतात. एखाद्या व्यक्तिस विशिष्ट घटना, प्रसंग किंवा विचार दुसऱ्यास सांगावयाचा असल्यास "मला तुला एक गोष्ट सांगावयाची आहे" असे म्हणत असतो. दुसराही ती गोष्ट ऎकण्यासाठी उत्सुकतेने कान टवकारतो. खर म्हणजे गोष्ट आपल्या जीवनाशी एकरुप झालेली असते. परंतू अतिपरीचयामुळे आपल गोष्टीच्या किंवा कथेच्या महत्वाकडे दुर्लक्ष झालेल आहे. कथा ही ’गागर में सागर’ सारखीच असते. गोष्ट लहान असो की मोठी ती ऎकणाऱ्यावर परीणाम करीत असते, ऎकणाऱ्याला विचार करायला लावते, ऎकणाऱ्याच मनोरंजनही करीत असते, ऎकणाऱ्यावर नकळ्त संस्कार करीत असते.
साने गुरुजींनी गोष्टीच महत्व ओळखल होत. ते मुलांना गोड गोष्टी सांगत. कथेच्या माध्यमातून मुलांच्या चारित्र्याची घडण व्हावी म्हणून संस्कारदायी कथा सांगत. मुले त्यांच्या भोवती सदा गोळा होत व ते ही मुलांमध्ये रमून जात. साने गुरुजींनी सारे बालवाङमय त्या द्रुष्टीने लिहिले आहे.
मुले म्हणजे देवा घरची फुले, मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ठेव. आजची मुले आपल्या राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. आजच्या बालकांवर सुसंस्कार झालेत, त्यांच्यात नितीमूल्ये रुजलीत तरच आपला देश ’महासत्ता’ बनेल. गोष्टी (कथा) आणि अन्य विधायक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याव्दारे बालकांना राष्ट्राचे भावी आदर्श नागरिक बनविता येऊ शकते.
मुलांना बालपणापासूनच गोष्टी ऎकण्याचे वेड असते. गोष्टीसाठी ती मोठ्यांना भंडावून सोडतात. त्यांच्या ठायीच्या ह्या चांगल्या वेडाला संस्काराचे खतपाणी पुरविले पाहिजे. गोष्ट ही वरवर लहान दिसणारी वस्तू असली तरी परिणामाने, प्रभावाने, सामर्थ्याने ती महान आहे. गोष्टीतले हे सामर्थ्य जाणले पाहिजे आणि बालपणाला चांगला आकार देण्यासाठी तिची जोपासना झाली पाहिजे.
मराठी भाषीकांपर्यंत कथेच बालसंस्कारासाठीच महत्व पोहचवाव आणि ’कथामाला’ या बालकांसाठीच्या चळवळीची माहिती पोहचवावी यासाठीच . . . ही धडपड.
मुले म्हणजे देव, मुले म्हणजे देव
मुले आहेत राष्ट्राची मोलाची ठेव.

रविवार, 14 सितंबर 2008

तरुण पिढी व भोगवाद

तरुण पिढीला हिंसाचार व भोगवादापासून वाचवा !
गेल्या काही दिवसात शाळेतल्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्याचा खून करण्याच्या अनेक घटना घडल्याचे वाचनात आले. शाळकरी मुलांपर्यंत हिंसाचाराचे लोण पोहोचणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच वर्ष अखेरचे निमीत्त साधून ३१ डिसेंबरला दारु पिऊन वाहने बेफाम चालवणे व तरुणींचा विनयभंग करणे, एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करणे आदि प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसाचार व भोगवादी प्रवृत्ती तरुण पिढीत शिरली तर संबंध राष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल.
आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करुन राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ही भूमिका पार पाडण्यासाठी शरीर, मन आणि बुध्दीला चांगले वळण देण्याच्या वयात आपली तरुण व बालकुमारांची पिढी बेफाट भोगलालसेच्या व हिंसाचाराच्या आहारी जात आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.
शांततेच्या मार्गाने समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याची व सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरीकांनी वेळीच सावध होऊन नव्या पिढीमध्ये होऊ लागलेली हिंसाचाराची व चंगळवादाची लागण थांबवण्यासाठी निर्धारपूर्वक पावले उचलली पाहिजेत.
तरुण पिढी हिंसाचार व भोगवादापासून वाचवण्यासाठी - हे करा.
१. पालकांनी / शिक्षकांनी मुला-मुलींशी मोकळा संवाद वाढवावा.
२. हिंसाचाराचे मानस तयार होईल अशी खेळणी मुलांसाठी घॆऊ व भेट देऊ नयेत.
३. पालकांनी वाचन संस्कृती वाढवावी व आपल्या भागात साने गुरुजी कथामाला सुरू करण्यात पुढाकार घ्यावा.
४. भोगवाद आणि हिंसाचार यांची दृष्ये / बातम्या टी.व्ही. तसेच पेपरातून प्रसिध्द करु नयेत.
५. कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत भोगवादी व हिंसाचारी चित्रे देऊ नयेत.
६. हिंसाचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे.

जागतिक अहिंसा दिन

जागतिक अहिंसा दिन
संयुक्त राष्ट्र्संघाने २ ऑक्टोबर महत्मा गांधी जयंती हा जागतिक अहिंसा दिन पाळावा असे आवाहन केले आहे. त्यासाठी शाळाशाळांत खालील प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी घेतील असे योजावे.
प्रतिज्ञा
"हिंसाचार, भ्रष्टाचार य चंगळ्वाद या अपप्रवृत्तींपासून भारताला वाचविण्यासाठी साधेपणाने जीवन जगणे व शस्त्राचा वापर न करणे हे पथ्य मी पाळीन. ’एक बनो नेक बनो’ हा आजचा युगमंत्र आहे. जात, धर्म, वंश, लिंग आदि कुठ्ल्याही कारणावरुन भेदभाव व पक्षपात न करता मी सर्वांशी बंधुभावाने वागेन अशी प्रतिज्ञा आज महात्मा गांधी जयंती दिनी घेत आहे."