रविवार, 14 सितंबर 2008

तरुण पिढी व भोगवाद

तरुण पिढीला हिंसाचार व भोगवादापासून वाचवा !
गेल्या काही दिवसात शाळेतल्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्याचा खून करण्याच्या अनेक घटना घडल्याचे वाचनात आले. शाळकरी मुलांपर्यंत हिंसाचाराचे लोण पोहोचणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच वर्ष अखेरचे निमीत्त साधून ३१ डिसेंबरला दारु पिऊन वाहने बेफाम चालवणे व तरुणींचा विनयभंग करणे, एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करणे आदि प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसाचार व भोगवादी प्रवृत्ती तरुण पिढीत शिरली तर संबंध राष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल.
आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करुन राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ही भूमिका पार पाडण्यासाठी शरीर, मन आणि बुध्दीला चांगले वळण देण्याच्या वयात आपली तरुण व बालकुमारांची पिढी बेफाट भोगलालसेच्या व हिंसाचाराच्या आहारी जात आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.
शांततेच्या मार्गाने समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याची व सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरीकांनी वेळीच सावध होऊन नव्या पिढीमध्ये होऊ लागलेली हिंसाचाराची व चंगळवादाची लागण थांबवण्यासाठी निर्धारपूर्वक पावले उचलली पाहिजेत.
तरुण पिढी हिंसाचार व भोगवादापासून वाचवण्यासाठी - हे करा.
१. पालकांनी / शिक्षकांनी मुला-मुलींशी मोकळा संवाद वाढवावा.
२. हिंसाचाराचे मानस तयार होईल अशी खेळणी मुलांसाठी घॆऊ व भेट देऊ नयेत.
३. पालकांनी वाचन संस्कृती वाढवावी व आपल्या भागात साने गुरुजी कथामाला सुरू करण्यात पुढाकार घ्यावा.
४. भोगवाद आणि हिंसाचार यांची दृष्ये / बातम्या टी.व्ही. तसेच पेपरातून प्रसिध्द करु नयेत.
५. कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत भोगवादी व हिंसाचारी चित्रे देऊ नयेत.
६. हिंसाचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे.

कोई टिप्पणी नहीं: