मंगलवार, 20 नवंबर 2007

Sane guruji

जगातील वेगवेगळ्या देशांमध्वे उपजिवेकेसाठी वास्तव्य करीत असलेल्या मराठी भाषीकाना साने गुरूजींच्या जीवनाची, कार्याची, साहित्याची माहिती व्हावी. साने गुरूजी बद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सूकता निर्माण व्हावी. यासाठी ब्लाग व्दारे साने गुरूजींचे जीवन, कार्य, साहित्य, विचार याची माहिती उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करावा अशी कल्पना सूचली. म्हणुन हा प्रयत्न !
मुलांवर संस्कार करणारी माता ही आद्य गुरू मानली जाते, असे असले तरी स्वतंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्राला एक गुरूमाऊली लाभली ! ही मायमाऊली म्हणजेच मातृधर्मी साने गुरूजी ! विव्द्ता, सर्वस्वाचा त्याग, सेवापरायणता आणि ब्रम्हचारी राहून सर्व विश्वाच्या संसाराची चिंता वाहण्याची साधूवृत्ती हे महत्वाचे गुण त्यांच्या अंगी हॊते. गुरूजी म्हणायचे की मी "एक परार्धांश गांधीजींचा, एक परार्धांश रामकृष्णांचा आणि एक परार्धांश रवींद्रनाथ टागॊरांचा आहे." त्यांनी आपल्या जीवनात या तीन आदर्शांचा अंगिकार करुन सारे आयुष्य जनसेवा आणि देशसेवेसाठी वेचले. एक देशभक्त, सात्विक अंत:करणाचा, कवी हृदयाचा माणूस म्हणून गुरूजींचे व्यक्तिमत्व सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
त्यांनी लिहीलेली एक प्रार्थना - खरा धर्म
खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे॥
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे॥
सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे॥
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे॥
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे॥
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे॥

1 टिप्पणी:

Unknown ने कहा…

जीवनात या सान काय अन् काय महान खरे
ही साने गुरुजींनी लिहिले ली प्रार्थना आहे का?