शुक्रवार, 16 मार्च 2012

शुक्रवार, 11 सितंबर 2009

नवी Aavhane

नवी आव्हाने
मुलांना गोष्टी सांगून त्यांचे भावविश्व समृध्द करणे हा गुरुजींचा आवडता छंद होता. त्यांच्या मृत्यूनंतर स्मारक करण्याऎवजी चैतन्यशक्ती चळवळीच्या रूपाने स्मारक साकारावे असे एका धडपडणाऱ्या मुलाला वाटले. १९५१ साली श्री. प्रकाशभाई मोहाडीकरांनी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा कथा सांगण्याचा कार्यक्रम अनेक शिक्षक नियमितपणे करू लागले. महाराष्ट्रातील पंधरा-वीस जिल्ह्यातील सुमारे चारशे प्राथमिक / माध्यमिक शाळांमध्ये या संघटनेच्या शाखा मुलामुलींच्या कथाकथनाच्या स्पर्धा होऊ लागल्या. संघटनेने सुरु केलेल्या कथाकथन प्रबोधिनीचे काम पुण्याच्या कार्यकर्त्यांनी चांगले चालवले आहे. नवनवे कथाकथनकार तयार करण्यासाठी शेकडोनी शिबिरे घेण्यात आली. कार्यकर्ते-शिक्षकांना उपयोगी पडतील अशी पुस्तके प्रकाशित करण्यात आली. "श्यामची आई" या पुस्तकावर आधारित परीक्षा घेण्याचा उपक्रम गेली काही वर्षे चालवला जात असून चार पाच हजार मुलेमुली त्यात आनंदाने भाग घेतात.
काथामाला संघटनेचे लोण गोव्यात केव्हाच पोहचले. तेथे राज्य पातळीवर नियमितपणे मुलामुलींच्या कथाकथन स्पर्धा घेतल्या जातात.
अन्य राज्यात कथामालेचे काम रुजावे यासाठी अनेक कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. साने गुरुजींच्या अनेक पुस्तकांचा हिंदी अनुवाद स्वराज्य प्रकाशन दिल्ली यांनी प्रकाशित केला आहे. दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात काही शाखा चालत आहेत. आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यातील काही कार्यकर्ते कथामालेचे काम त्यांच्या प्रादेशिक भाषांतून चालवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गेल्या काही वर्षात समाजजीवनात चंगळवाद थैमान घालू लागला आहे. मुलांनी एकमेकांचे मुडदे पाडणे, एकतर्फी प्रेमभंगाचे निमित्त सांगून रिंकू पाटील सारख्या कळ्या चुरगाळून टाकणे असले प्रकार वाढत चालले आहे. प्रसार माध्यमे हिंसाचार व भोगवादाला बेभानपणे उत्तेजन देत आहेत. या प्रवृत्तींचा मुकाबला करण्यासाठी शिक्षकांशी संवाद वाढवून त्यांची वैचारिक बैठक व सामाजिक बांधिलकी वाढवणे याकडे कथामाला विशेष लक्ष देऊ लागली आहे.
या संघटनेचे काम चारी दिशांनी वाढवण्यासाठी विविध साहित्य व साधने वापरली पाहिजेत. कार्यकर्त्यांनी दौरे काढून नवनवे शिक्षक जोडले पाहिजेत. परंतू हे सगळे करण्यासाठी संघटनेचा कायम निधी असणे आवश्यक आहे.ज्या सहॄदांना या कामाचे महत्व व आवश्यकता वाटत असेल तर आपल्या परिने मदत करावी. या आव्हानाला आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत . . . . . . . . . . . . . .
मदतीसाठी पत्ता -
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला
व्दारा- साने गुरुजी विद्यालय, भिकोबा वामन पाठारे मार्ग,
दादर (प.), मुंबई ४०००२८.
दूरध्वनी : (०२२) २४४४५९९६ / २४४५५९६९

मंगलवार, 1 सितंबर 2009

तरुण Pidhi

तरुण पिढी व भोगवाद
तरुण पिढीला हिंसाचार व भोगवादापासून वाचवा !
गेल्या काही दिवसात शाळेतल्या एका विद्यार्थ्याने दुसîrÉÉचा खून करण्याच्या अनेक घटना घडल्याचे वाचनात आले. शाळकरी मुलांपर्यंत हिंसाचाराचे लोण पोहोचणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच वर्ष अखेरचे निमीत्त साधून ३१ डिसेंबरला दारु पिऊन वाहने बेफाम चालवणे व तरुणींचा विनयभंग करणे, एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करणे आदि प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसाचार व भोगवादी प्रवृत्ती तरुण पिढीत शिरली तर संबंध राष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल.
आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करुन राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ही भूमिका पार पाडण्यासाठी शरीर, मन आणि बुध्दीला चांगले वळण देण्याच्या वयात आपली तरुण व बालकुमारांची पिढी बेफाट भोगलालसेच्या व हिंसाचाराच्या आहारी जात आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.
शांततेच्या मार्गाने समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याची व सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याची इच्छा असणाîrÉÉ सर्व नागरीकांनी वेळीच सावध होऊन नव्या पिढीमध्ये होऊ लागलेली हिंसाचाराची व चंगळवादाची लागण थांबवण्यासाठी निर्धारपूर्वक पावले उचलली पाहिजेत.
तरुण पिढी हिंसाचार व भोगवादापासून वाचवण्यासाठी - हे करा.
१. पालकांनी / शिक्षकांनी मुला-मुलींशी मोकळा संवाद वाढवावा.
२. हिंसाचाराचे मानस तयार होईल अशी खेळणी मुलांसाठी घॆऊ व भेट देऊ नयेत.
३. पालकांनी वाचन संस्कृती वाढवावी व आपल्या भागात साने गुरुजी कथामाला सुरू करण्यात पुढाकार घ्यावा.
४. भोगवाद आणि हिंसाचार यांची दृष्ये / बातम्या टी.व्ही. तसेच पेपरातून प्रसिध्द करु नयेत.
५. कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत भोगवादी व हिंसाचारी चित्रे देऊ नयेत.
६. हिंसाचार करणाîrÉÉ गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे.

शुक्रवार, 26 सितंबर 2008

गुरुवार, 18 सितंबर 2008

कथा म्हणजे

कथा म्हणजे गॊष्ट. आज ही गोष्टीला पूर्वी इतकच महत्व आहे. आज मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध आहेत. तरी गोष्टीच वेड कमी झालेल नाही. गोष्ट अबालवृध्दाना आवडते. विविध धर्मग्रंथामध्येही अनेक कथा ठासून भरलेल्या आढळ्तात. प्रवचनकार व किर्तनकार आपल्या प्रवचनातून वा किर्तनातून आपला विचार श्रोत्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी अनेक कथांचे कथन करीत असतात. एखाद्या व्यक्तिस विशिष्ट घटना, प्रसंग किंवा विचार दुसऱ्यास सांगावयाचा असल्यास "मला तुला एक गोष्ट सांगावयाची आहे" असे म्हणत असतो. दुसराही ती गोष्ट ऎकण्यासाठी उत्सुकतेने कान टवकारतो. खर म्हणजे गोष्ट आपल्या जीवनाशी एकरुप झालेली असते. परंतू अतिपरीचयामुळे आपल गोष्टीच्या किंवा कथेच्या महत्वाकडे दुर्लक्ष झालेल आहे. कथा ही ’गागर में सागर’ सारखीच असते. गोष्ट लहान असो की मोठी ती ऎकणाऱ्यावर परीणाम करीत असते, ऎकणाऱ्याला विचार करायला लावते, ऎकणाऱ्याच मनोरंजनही करीत असते, ऎकणाऱ्यावर नकळ्त संस्कार करीत असते.
साने गुरुजींनी गोष्टीच महत्व ओळखल होत. ते मुलांना गोड गोष्टी सांगत. कथेच्या माध्यमातून मुलांच्या चारित्र्याची घडण व्हावी म्हणून संस्कारदायी कथा सांगत. मुले त्यांच्या भोवती सदा गोळा होत व ते ही मुलांमध्ये रमून जात. साने गुरुजींनी सारे बालवाङमय त्या द्रुष्टीने लिहिले आहे.
मुले म्हणजे देवा घरची फुले, मुले म्हणजे राष्ट्राची मोलाची ठेव. आजची मुले आपल्या राष्ट्राचे भावी आधारस्तंभ. आजच्या बालकांवर सुसंस्कार झालेत, त्यांच्यात नितीमूल्ये रुजलीत तरच आपला देश ’महासत्ता’ बनेल. गोष्टी (कथा) आणि अन्य विधायक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याव्दारे बालकांना राष्ट्राचे भावी आदर्श नागरिक बनविता येऊ शकते.
मुलांना बालपणापासूनच गोष्टी ऎकण्याचे वेड असते. गोष्टीसाठी ती मोठ्यांना भंडावून सोडतात. त्यांच्या ठायीच्या ह्या चांगल्या वेडाला संस्काराचे खतपाणी पुरविले पाहिजे. गोष्ट ही वरवर लहान दिसणारी वस्तू असली तरी परिणामाने, प्रभावाने, सामर्थ्याने ती महान आहे. गोष्टीतले हे सामर्थ्य जाणले पाहिजे आणि बालपणाला चांगला आकार देण्यासाठी तिची जोपासना झाली पाहिजे.
मराठी भाषीकांपर्यंत कथेच बालसंस्कारासाठीच महत्व पोहचवाव आणि ’कथामाला’ या बालकांसाठीच्या चळवळीची माहिती पोहचवावी यासाठीच . . . ही धडपड.
मुले म्हणजे देव, मुले म्हणजे देव
मुले आहेत राष्ट्राची मोलाची ठेव.

रविवार, 14 सितंबर 2008

तरुण पिढी व भोगवाद

तरुण पिढीला हिंसाचार व भोगवादापासून वाचवा !
गेल्या काही दिवसात शाळेतल्या एका विद्यार्थ्याने दुसऱ्याचा खून करण्याच्या अनेक घटना घडल्याचे वाचनात आले. शाळकरी मुलांपर्यंत हिंसाचाराचे लोण पोहोचणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. तसेच वर्ष अखेरचे निमीत्त साधून ३१ डिसेंबरला दारु पिऊन वाहने बेफाम चालवणे व तरुणींचा विनयभंग करणे, एकतर्फी प्रेमातून मुलीचा खून करणे आदि प्रकारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हिंसाचार व भोगवादी प्रवृत्ती तरुण पिढीत शिरली तर संबंध राष्ट्राचे भवितव्य धोक्यात येईल.
आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करुन राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ही भूमिका पार पाडण्यासाठी शरीर, मन आणि बुध्दीला चांगले वळण देण्याच्या वयात आपली तरुण व बालकुमारांची पिढी बेफाट भोगलालसेच्या व हिंसाचाराच्या आहारी जात आहे. ही चिंताजनक प्रवृत्ती आहे.
शांततेच्या मार्गाने समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याची व सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याची इच्छा असणाऱ्या सर्व नागरीकांनी वेळीच सावध होऊन नव्या पिढीमध्ये होऊ लागलेली हिंसाचाराची व चंगळवादाची लागण थांबवण्यासाठी निर्धारपूर्वक पावले उचलली पाहिजेत.
तरुण पिढी हिंसाचार व भोगवादापासून वाचवण्यासाठी - हे करा.
१. पालकांनी / शिक्षकांनी मुला-मुलींशी मोकळा संवाद वाढवावा.
२. हिंसाचाराचे मानस तयार होईल अशी खेळणी मुलांसाठी घॆऊ व भेट देऊ नयेत.
३. पालकांनी वाचन संस्कृती वाढवावी व आपल्या भागात साने गुरुजी कथामाला सुरू करण्यात पुढाकार घ्यावा.
४. भोगवाद आणि हिंसाचार यांची दृष्ये / बातम्या टी.व्ही. तसेच पेपरातून प्रसिध्द करु नयेत.
५. कंपन्यांनी आपल्या जाहिरातीत भोगवादी व हिंसाचारी चित्रे देऊ नयेत.
६. हिंसाचार करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे.

जागतिक अहिंसा दिन

जागतिक अहिंसा दिन
संयुक्त राष्ट्र्संघाने २ ऑक्टोबर महत्मा गांधी जयंती हा जागतिक अहिंसा दिन पाळावा असे आवाहन केले आहे. त्यासाठी शाळाशाळांत खालील प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी घेतील असे योजावे.
प्रतिज्ञा
"हिंसाचार, भ्रष्टाचार य चंगळ्वाद या अपप्रवृत्तींपासून भारताला वाचविण्यासाठी साधेपणाने जीवन जगणे व शस्त्राचा वापर न करणे हे पथ्य मी पाळीन. ’एक बनो नेक बनो’ हा आजचा युगमंत्र आहे. जात, धर्म, वंश, लिंग आदि कुठ्ल्याही कारणावरुन भेदभाव व पक्षपात न करता मी सर्वांशी बंधुभावाने वागेन अशी प्रतिज्ञा आज महात्मा गांधी जयंती दिनी घेत आहे."

श्यामची AAi

साने गुरुजी च्या शामची आई पुस्तकावर संस्कार परीक्षा
साने गुरुजीं च्या मानवतावादी विचारांचा प्रचार करणारे चालते बॊलते सजीव स्मारक म्हणून "साने गुरुजी कथामाला" स्थापन झाली. या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाले च्या वतीने कित्येक वर्षापासून शामची आई पुस्तकावर संस्कार परीक्षा घेतली जाते. यंदा ही संस्कार परीक्षा येत्या डिसेंबर महिन्यात दोन विभागात घ्यावयाचे ठरविले आहे.
पहिला गट : इयत्ता ५ वी ते ७ वी - गुण ५०
दुसरा गट : इयत्ता ८ वी ते १० वी - गुण १००
पहिल्या गटासाठी ’चित्रमय शामची आई’ हे पुस्तक व दुसऱ्या गटासाठी ’शामची आई’ हे नेहमीचे पुस्तक यातून प्रश्नपत्रिका काढली जाईल.
परीक्षेसंबंधी महत्वाची माहीती -
१) ही परीक्षा डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी त्या त्या शाळेत संपन्न होईल.
२) किमान २५ विद्यार्थी ज्या शाळेतून बसतील अशाच शाळांना परीक्षा केंद्र देण्यात येईल.
३) पहिल्या १० विद्यार्थ्याना रोख बक्षिसे दिली जातील. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्याना प्रमाणपत्रे दिली जातील.

गुरुवार, 29 नवंबर 2007

साने गुरुजींच्या कविता - १
१. असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाहि पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोति मृत्तिकेवी
तुझ्या कृपेने रे होतिल सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरि मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
२. बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो ॥धृ॥
हे कंकण करी बांधियले
जनसेवे जीवन दिधले
देशार्थ प्राण हे उरले
मी सिध्द मरायला हो ॥१॥
वैभवी देश चढवीन
स्वातंत्र्य त्यास अर्पीन
हा तिमीर घोर संहारिन
या बंधू सहाय्याला हो ॥२॥

शुक्रवार, 23 नवंबर 2007

साने गुरुजींच्या कवितांविषयी - २
साने गुरुजी सत्य, शिव, सुंदरतेचे उपासक होते. त्यांच्या मूल्यशिक्षणाच्या कल्पना त्याच वृत्तीतून साकारलेल्या आहेत. बालकांना गोष्टी सांगाव्या, चार चांगली भावपूर्ण गाणी म्हणावी, हा त्यांचा ध्यास होता. गावोगावी फिरताना गुरुजी बालकांच्या मेळाव्यात हरवून जायचे, त्यांना गोष्टी सांगायचे, मुलांकडून गाणी म्हणून घ्यायचे. उद्याची ही पिढी देशाच्या विकासात महत्वाची भूमिका वठवणार आहे, ही दूरदृष्टी गुरुजींजवळ होती. म्हणून लहान मुलांची भावनिक भूक भागवून त्यांच्या मनावर मातृधर्माचा आणि प्रेमधर्माबरोबरच देशभक्तीचा संस्कार गुरुजी करीत होते. एका श्रध्दाशील आत्म्याचा हा विधायक ध्यास होता.
हस रे माझ्या मुला
वारा वदे कानामध्ये
गीत गाइन तुला
ताप हरिन शांति देइन
हस रे माझ्या मुला ॥१॥
चिमणी येऊन नाचुन बागडुन
काय म्हणे मला
चिंवचिंव करिन चिंता हरिन
हस रे माझ्या मुला ॥२॥
हिरवे हिरवे डोले बरवे
झाड बोले मला
छाया देइन फळफूल देइन
हस रे माझ्या मुला ॥३॥
सुमन वदे मोठ्या मोदे
प्रेम देइन तुला
गंध देइन रंग दाविन
हस रे माझ्या मुला ॥४॥
रवी-शशी ताराराशी
दिव्य दाविन तुला
देइन प्रकाश बोले आकाश
हस रे माझ्या मुला ॥५॥
पाऊस पडेल पृथ्वि फुलेल
मेघ म्हणे मला
नद्या नाले बघशील भरले
हस रे माझ्या मुला ॥६॥
हिरवे हिरवे कोमल रवें
तृण म्हणे मला
माझ्यावरी शयन करी
हस रे माझ्या मुला ॥७॥
जेथे जाइन जेथे पाहिन
ऎकु ये मला
रडु नको रुसू नको
हस रे माझ्या मुला ॥८॥
पदोपदीं अश्रु काढी
कुणि न बोलला
सृष्टि तारी मंत्र उच्चारी
हस रे माझ्या मुला ॥९॥
माझ्या अश्रुंनो माझ्या मित्रांनो
खोलीमध्ये चला
दार घेऊ लावुन या तुम्ही धावुन
तुम्हिच हसवाल मला ॥१०॥

बुधवार, 21 नवंबर 2007

साने गुरुजीच्या कवितां बाबत - १

साने गुरुजींच्या कवितांविषयी - १
साने गुरूजींच्या कवितांचा समग्र विचार केला तर देवभक्ती आणि देशभक्तीने त्यांची कविता ऒतप्रॊत भरलेली आहे. सर्वत्र देवाच्या स्वरुपाचे दर्शन घेऊन जनी जनार्दन शोधण्याची त्यांची वृत्ती देशभक्तीपर्यंत जाऊन पोहोचते. म्हणूनच गांधीजींच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी सन १९३० साली अमळनेरच्या आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. खानदेश ही त्यांची कर्मभूमी! या कर्मभूमीत त्यांनी गावोगावी भूमीगत कार्य करुन समाजप्रबोधनाचे आणि जनजागरणाचे काम केले. त्यांची धडपडणारी मुले गावागावात, समाजात प्राणवायू ओतण्याचे कार्य करीत होते. गुरुजींची गेय, भावकविता, गाणी म्हणत गावागावांत देशभक्तांची, तरुणांची पथके कार्यरत झाली होती.
’भारत माता माझी लावण्याची खाण’ अशी ही भावकविता ’स्वातंत्र्याचे आम्ही शिपाई सुखवू प्रियतम भारत माई’ असा उदगार करत गावागावांत चैतन्य निर्माण करीत होती. इथला कष्टकरी "मजूर" हाच खरा देवाचा आणि देशाचा उपासक आहे, अशी प्रांजळ भावना गुरुजींच्या मनातून आपल्या कवितेव्दारे व्यक्त होत होती. "मानवता" हाच "खरा धर्म" आहे, असे ठामपणे आपल्या कवितेतून सांगणारा आधुनिक "संत" म्हणजेच साने गुरुजी.
सारा समाज सुखी आणि संपन्न व्हावा, कला विद्न्यानमय व्हावा हा ध्यास घेणारे गुरुजी आशावादी द्दष्टिकोनातून परमेश्वरास नमस्कार करतात. त्याच्या कृपेवा प्रसाद मिळावा म्हणून त्याची आळवणी करतात. या भक्तीच्या शक्तीने माणूस बलवान झाला की इंग्रजांना इथून सहज बाहेर काढता येईल आणि लोकशक्तीच्या रूपाने स्वातंत्र्य मिळ्वून आम्ही भारतमातेला सुखी करु. ही भावना गुरुजींच्या कवितेतून सर्वत्र दिसते.
मजूर
आम्ही देवाचे मजूर
आम्ही देशाचे मजूर
कष्ट करू भरपूर ॥धॄ॥
बाहेरिलही शेती करून
धनधान्याने तिला नटवुन
फुलांफळांनी तिला हसवुन
दुष्काळा करु दूर ॥१॥
हॄदयातिलही शेती करुन
स्नेहदयेचे मळे पिकवुन
समानता स्नेहाला निर्मुन
सौख्या आणू पूर ॥२॥
रोगराईला करूनी दूर
घाण सकळही करुनी दूर
स्वर्ग निर्मु तो या पृथ्वीवर
बदलू सारा नूर ॥३॥
दिवसभर असे कष्ट करून
जाऊ घामाघुम होऊन
रात्री भजनीं जाउ रमून
भक्तीचा धरू सूर ॥४॥
कर्मामध्ये दिव्यानंद
सेवेमध्ये दिव्यानंद
नाही अन्य फळांचा छंद
नाही काहि जरूर ॥५॥

मंगलवार, 20 नवंबर 2007

Sane guruji

जगातील वेगवेगळ्या देशांमध्वे उपजिवेकेसाठी वास्तव्य करीत असलेल्या मराठी भाषीकाना साने गुरूजींच्या जीवनाची, कार्याची, साहित्याची माहिती व्हावी. साने गुरूजी बद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सूकता निर्माण व्हावी. यासाठी ब्लाग व्दारे साने गुरूजींचे जीवन, कार्य, साहित्य, विचार याची माहिती उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करावा अशी कल्पना सूचली. म्हणुन हा प्रयत्न !
मुलांवर संस्कार करणारी माता ही आद्य गुरू मानली जाते, असे असले तरी स्वतंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्राला एक गुरूमाऊली लाभली ! ही मायमाऊली म्हणजेच मातृधर्मी साने गुरूजी ! विव्द्ता, सर्वस्वाचा त्याग, सेवापरायणता आणि ब्रम्हचारी राहून सर्व विश्वाच्या संसाराची चिंता वाहण्याची साधूवृत्ती हे महत्वाचे गुण त्यांच्या अंगी हॊते. गुरूजी म्हणायचे की मी "एक परार्धांश गांधीजींचा, एक परार्धांश रामकृष्णांचा आणि एक परार्धांश रवींद्रनाथ टागॊरांचा आहे." त्यांनी आपल्या जीवनात या तीन आदर्शांचा अंगिकार करुन सारे आयुष्य जनसेवा आणि देशसेवेसाठी वेचले. एक देशभक्त, सात्विक अंत:करणाचा, कवी हृदयाचा माणूस म्हणून गुरूजींचे व्यक्तिमत्व सर्व महाराष्ट्राला माहीत आहे.
त्यांनी लिहीलेली एक प्रार्थना - खरा धर्म
खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे॥
जगी जे हीन अति पतित
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे । जगाला प्रेम अर्पावे॥
सदा जे आर्त अति विकल
जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे । जगाला प्रेम अर्पावे॥
कुणा ना व्यर्थ शिणवावे
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावे । जगाला प्रेम अर्पावे॥
प्रभूची लेकरे सारी
तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे । जगाला प्रेम अर्पावे॥
असे हे सार धर्माचे
असे हे सार सत्याचे
परार्था प्राणही द्यावे । जगाला प्रेम अर्पावे॥